प्रजासत्ताक दिवस हा
भारतात दरवर्षी २६
जानेवारी ह्या दिवशी साजरा
केला जातो. २६ जानेवारी
१९५० रोजी नव्याने
स्वातंत्र्य मिळालेल्या
भारत देशाने संविधानाचा
स्वीकार करुन लोकशाहीतील
एका नव्या पर्वाची
सुरुवात केली होती.
प्रजासत्ताक दिवस
भारतातील तीन राष्ट्रीय
सुट्ट्यांच्या दिवसांपैकी
एक आहे. (इतर दोनः
स्वातंत्र्य दिवस: १५
ऑगस्ट व गांधी जयंती: २
ऑक्टोबर). ह्या दिवशी
भारताची राजधानी, नवी
दिल्ली येथे एक मोठी परेड
(संचलन) राजपथ मार्गावरून
निघते.
भारतीय फौजांचे (नौदल,
पायदल, वायुसेना) वेगवेगळे
सेनाविभाग, घोडदळ, पायदळ,
तोफखाना आणि इतर अद्ययावत
शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे
पृथ्वी, अग्नी)समवेत
संचलन करतात. भारतीय
राष्ट्रपती या फौजांची
मानवंदना स्वीकारतात.
या संचलना बरोबरच
भारतातील विविध
संस्कृतींची झलकही
प्रस्तुत केली जाते.
या सारखेच संचलन भारतातील
सर्व राज्यांत आयोजीत केले
जाते. प्रत्येक राज्यात
त्या त्या राज्याचे
राज्यपाल फौजांची मानवंदना
स्वीकारतात